अंधश्रदधेने भरकटलेल्या या जगात
काय काय घडत नाही,
चारही दिशांना त्रासच त्रास
आणि त्यातच चाले सर्व काही.
अंधश्रदधेची वाढलेली ही वाईट प्रवृत्ती
कशी कमी करणार,
धैर्यासारखे सामोरे जाणार
कि त्यातच् जन्मभर मरणार.
आपल्या जीवनाचा झालेला र्हास
आणि लोकांना झालेल भास,
काय आपल्याच या परंपरेत
आपण बसवणार गळ्याला फास.
पण आता बसं
आम्हीच आमच्या या जीवनाचा मार्ग शोधनार
आणि त्याच वाट्याने जाणार,
गुलाबाची ही कळी उमलेल कि नाही
हे आम्हीच आमचे ठरवणार.