ज्यांनी सर्व किल्ले जिंकुन आपल्या साम्राज्याचे
नेहमी रक्षण केले आणि आपल्या
प्रजेला नेहमी मान दिला,
असे होते आमचे शिवाजी महाराज
ज्यांनी श्रीमंतीत आदराने झुकायला
आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला शिकवले
व खर्या माणसाची ओळख करुन दिली
असे होते आमचे शिवाजी महाराज.
शिवाजी महारजांसारखे राजे दुसरे कोणीच
असु शकत नाही, हे त्यांनी आपल्या
शत्रूंचा विनाश करुन दाखवलेच,
असे होते आमचे शिवाजी महाराज.
शिवजयंती म्हटली की ढोल ताशे आणि गाणे
व लोकांनी केलेले ध्वनी प्रदुषणचे बहाणे
अरे शिवाजी महाराजांची महती तर
सारया जगालाच ठाउक आहे,पण
कोणी शिवाजी महाराजांसारखे बनून
दाखवेल तर गोष्टच निराळी.
इतिहासाच्या पानावर नाव कोरणारया
अशा शिवाजी महाराजांना आमचे त्रिवार वंदन.